✍️ लोकवाणी आवाज टिम
📅 ७ मे २०२६
![]() |
| राज्यातील अनेक जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाचा इशारा; काही भागांत वादळी वातावरण निर्माण. |
राज्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच आता हवामानात बदल होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भारतीय हवामान विभागाने पुढील दोन दिवस राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त केली असून काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उष्णतेसोबतच वाढलेल्या दमट वातावरणामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून आता पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या भागांत उष्ण व दमट हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. तर सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनीही सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जनगणना 2027 अपडेट: 1 मेपासून मोठा बदल; आता घरबसल्या माहिती भरा, पूर्ण प्रक्रिया डिजिटल
👉 संपूर्ण बातमी वाचा
गडचिरोलीत काही दिवसांपूर्वी वादळासह पावसाची हजेरी
दरम्यान, ५ मे रोजी गडचिरोली जिल्ह्यात सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला होता. काही भागांत सुरुवातीला जोरदार वाऱ्यासह वादळी परिस्थिती निर्माण झाली आणि त्यानंतर पावसाने हजेरी लावली होती. दिवसभराच्या तीव्र उकाड्यानंतर आलेल्या या पावसामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता.
राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा ४२ अंशांच्या पुढे गेल्याची नोंद झाली आहे. वर्धा, अमरावती, गडचिरोली, अकोला, वाशीम, ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर या भागांमध्ये तीव्र उष्णतेची लाट कायम असल्याचे दिसून आले. तसेच सोलापूर, परभणी आणि यवतमाळ येथेही तापमान ४१ अंशांपेक्षा अधिक नोंदवण्यात आले.
शिवाजी महाविद्यालयात जागतिक वसुंधरा दिन साजरा; पर्यावरण संवर्धनाचा संदेश
👉 पूर्ण माहिती वाचा
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस राज्यात काही भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता कायम राहणार आहे. मात्र शनिवारनंतर हवामान पुन्हा कोरडे होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासन आणि हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

